
Written by
Ganesh Khodke
📍 सेलू सेलू प्रखंडामध्ये बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देत देशात वाढत चाललेल्या विकृत जिहादी मानसिकता, अवैध कब्जे आणि सुनियोजित षड्यंत्रांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व परतवाडा येथे घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा तसेच पुणे येथील TCS कंपनीमधील धर्मांतरणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यासोबतच सेलू परिसरातील गावांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली











