
सेलू : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सेलू येथील माहेर शांती निवास येथील रुग्णांना तसेच केळझर येथील सत्यानंद स्मारक समिती मधील सर्व भंतेजींना शीतपेय वाटप करून जयंती सेवाभावी पद्धतीने साजरी करण्यात आली.
भारत कल्याण बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रजत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णांना व भंतेजींना शीतपेय वाटप करून मानवतेचा संदेश देत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मा. शेळके साहेब (सेवानिवृत्त), सिद्धार्थ पाटील सर, विशाल भाऊ रंगारी, आयुष धनवीज, उमंग शिंदे, पवन अहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
या सेवाभावी उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील गरजूंप्रती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.











